मध्यवर्गीय आयुष्यातील भावभावना नातेसंबंध, नाट्य यांचे चित्रण सुमती भिडे यांच्या या कथासंग्रहातून होते. या संग्रहात एकूण २० कथा आहेत. संग्रहातील पहिल्याच ‘यात्रा’ या कथेत जन्मापासून अंतिम काळापर्यंत मनुष्य यात्रेकरूच असतो, ही संकल्पना या कथेचा आत्मा आहे. ‘नकुशी’ या कथेत अनाथ आश्रमातील दत्तक मुलगी आणि रक्ताचे नाते नसलेली तिची आई यांचे नाते समोर येते. ‘मळभ’, ‘डाग’ आणि ‘पुनर्जन्म’ या कथांमध्ये उच्चशिक्षित, कमावत्या स्त्रीचे वास्तव दाखविले आहे.
‘आश्रित’ या कथेत ग्रामीण वास्तव समोर आले आहे. ग्रामीण भागातील नागरिक अद्याप शिक्षणापासून वंचित आहेत, हे सामाजिक सत्य त्यांनी कथेतून मांडले आहे. ‘विश्वामित्र’ ही कथा आर्याच्या विजीगिषु वृत्तीच्या सत्यावर आधारित आहे. ‘स्वप्ना’ या कथेत स्वप्नातून वास्तवात आलेल्या स्वप्नाची ओळख होते.
प्रकाशक : मधुश्री प्रकाशन
पाने : २२०
किंमत : ३२० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)